महागाईवरून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींची भाजपवर टीका
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायदा आणि महागाईवरून केंद्र सरकारवर सर्वच विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यात आता खाद्य पदार्थांसह इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्याने, किरकोळ महागाई दराने पाच वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. याच मुद्यावरून कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपाने खिसा कापून, पोटावर लाथ मारली असल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
सब्जियां, खाने पीने की चीजों के दाम आम लोगों की पहुंच से बाहर हो रहे हैं। जब सब्जी, तेल, दाल और आटा महंगा हो जाएगा तो गरीब खाएगा क्या? ऊपर से मंदी की वजह से गरीब को काम भी नहीं मिल रहा है।
भाजपा सरकार ने तो जेब काट कर पेट पर लात मार दी है। pic.twitter.com/LiSjNlnSWm
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 14, 2020
भाज्या, खाद्यपदार्थांच्या किंमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहेत. जर भाज्या, तेल, दाळ व धान्य महागले तर गरीबाने खावे तरी काय? त्यात आर्थिक मंदीमुळे गरिबांना काम देखील मिळत नाही. भाजपा सरकारने तर खिसा कापून पोटावर लाथ मारली आहे. असं प्रियंका गांधी यांनी ट्विट केलं आहे.
देशातील किरकोळ महागाई दराने गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. डिसेंबर 2019 मध्ये 7.35 टक्क्यांवर झेपावताना किरकोळ महागाई दर रिझव्र्ह बॅंकेकडून अंदाजित अशा टक्क्यांच्या जवळपास दुप्पट स्थिरावला. भाज्यांच्या किमती वाढल्याने महागाई दराचा भडका उडाला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात चलनवाढ रिझव्र्ह बॅंकेच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा (4 टक्के) वर नोंदवली गेली.
अर्थव्यवस्थेचा दर गेल्या सहा वर्षांच्या तळात असतानाच महागाईने डोके वर काढले आहे. भाज्या तसेच खाद्यान्नाच्या वाढत्या किंमतीमुळे महागाई दर आता रिझर्व्ह बॅंकेच्या सुरक्षित अशा 4 टक्क्यांच्याही पुढे गेला आहे. महागाईपेक्षा आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करत रिझर्व्ह बॅंकेने यंदा दरकपात टाळली होती. जगभर आणि विशेषत पश्चिम आशियातील तणावाच्या झळा बसू लागल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती आणखी भडकल्या, तर परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाईल, अशी दाट शक्यता आहे.