मुंबई: वंचित आघाडीच्या मतांच्या विभागणीचा लाभ महायुतीलाच होईल, असे मत केंद्रीय मंत्री व रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. प्रकाश आंबेडकरांच्या सभेबाबत बोलताना आठवले म्हणाले, ‘रिडालोस’च्या सभाही मोठ्या व्हायच्या. राज ठाकरेंच्या सुद्धा मोठ्या होतात. पण त्याचे मतांत परिवर्तन होत नाही. तिसऱ्या आघाडीला सत्ता मिळवण्याइतपत स्कोप नाही. म्हणून मी भाजपत आलो असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत रामदास आठवले यांना राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेत असल्याची माहिती आठवले यांनी दिली होती. या लोकसभा निवडणुकीत आठलेंची परिस्थिती तळ्यात कि मळ्यात अशीच होती.