सुरेश पिंगळे देशमुख यांची माहिती : घरटी दोन डस्टबीनचे वाटप
शिंदे वासुली (वार्ताहर) – भामचंद्र नगर, वासुली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रजासत्ताकदिनी ग्रामपंचायत वासुलीने नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत “स्वच्छ भारत’ व स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानांतर्गत कचरा संकलनासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन डस्टबीन असे सुमारे 500 डस्टबीन वाटप करण्यात आले. तर शनिवार (दि. 1 फेब्रुवारी) पासून गावठाण, वाड्या-वस्त्यांवरील कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. तत्पुर्वी ग्रामपंचायत हद्दीतील कचरा उचलून संपूर्ण गाव स्वच्छ करणार असल्याचे माजी उपसरपंच सुरेश पिंगळे देशमुख यांनी सांगितले.
यावेळी सरपंच इंदुबाई शेळके, उपसरपंच कांताबाई गावडे, सचिन पाचपुते, विनोद पाचपुते, ग्रामपंचायत सदस्या छाया जांभळे, पुष्पा पाचपुते, पोलीस पाटील अमोल पाचपुते, शिवसेना संपर्कप्रमुख अमोल पाचपुते, सचिन पाचपुते, ज्ञानेश्वर पाचपुते, अजित पाचपुते, शिवाजी कावरे, चंद्रकांत कावरे, अंकूश शेळके, बारकू जांभळे, मोहन पाचपुते, अतुल पाचपुते, राजमाता महिला संस्थेच्या अध्यक्षा रत्ना पिंगळे, आरती तोंडे, शोभा घुले, सारीका बांगर, हनुमंत दळवी, संतोष घुले, सुभाष भोरे, गोपाळ दळवी, प्रदिप घुले, योगेश घुले, अमोल घुले, किसन घुले, अंकूश पिंगळे, खंडू निकम, ज्ञानेश्वर जांभूळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व घरमालकांनी भाडेकरुंसाठी डस्टबिनची व्यवस्था करावी, अशी सूचना करून कचरा व्यवस्थापनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.