नवी दिल्ली : देशात करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा हळूहळू वाढ होताना दिसत आहे. रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत असून ही करोनाच्या तिसऱ्या लाटेची घंटा असल्याचे संकेत म्हटले जात आहे. दरम्यान,गेल्या २४ तासांत करोनाचे ४२ हजार ९०९ रुग्ण आढळले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात सध्या ३ लाख ७६ हजार ३२४ रुग्ण उपचाराधीन आहेत. रविवारी दिवसभरात ३४ हजार ७६३ जण करोनातून बरे झाले असून देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.५१ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत करोनातून ३ कोटी १९ लाख २३ हजार ४०५ रुग्ण बरे झाले आहेत.
India reports 42,909 new COVID-19 cases and 34,763 recoveries in the last 24 hours, taking total recoveries to 3,19,23,405 and active caseload to 3,76,324
Vaccination: 63.43 crores pic.twitter.com/NkRCImOgmz
— ANI (@ANI) August 30, 2021
देशातील आठवडी पॉझिटीव्हीटी रेट २.४२ टक्क्यांवर असून हा दर गेल्या ६५ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी दरात वाढ झाली असून ३४ दिवसांनी हा दर पुन्हा तीन टक्क्यांपेक्षा वर गेला आहे. सध्या डेली पॉझिटीव्हीटी रेट ३.२ टक्क्यांवर आहे.
India reports 42,909 new COVID-19 cases and 34,763 recoveries in the last 24 hours, taking total recoveries to 3,19,23,405 and active caseload to 3,76,324
Vaccination: 63.43 crores pic.twitter.com/NkRCImOgmz
— ANI (@ANI) August 30, 2021
गेल्या २४ तासांत देशात ३२ लाख १४ हजार ६९६ जणांना करोनाची लस देण्यात आली आहे.यासह एकूण लसीकरण ६३. ४३ टक्क्यांवर झाले आहे. एकट्या केरळ राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ८३६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ७५ जणांचा मृत्यू झाला आहे.