मुंबई: वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरी नोंदणीविरोधात धरणे आंदोलन केले. दरम्यान, मध्य मुंबईतील दादरी टीटी सर्कलमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
प्रकाश आंबेडकर यांनी असा दावा केला की मुस्लिमांव्यतिरिक्त सीएए आणि एनआरसीमुळे देशातील किमान 40 टक्के लोकांवर परिणाम करतील आणि त्याचे दुष्परिणाम अजूनही योग्यप्रकारे समजलेले नाहीत. सीएए आणि एनआरसीमुळे सर्वाधिक प्रभावित आदिवासी, वंचित जाती आणि भटके जमाती असतील. हे भांडण हिंदू-मुस्लिमांचे नसून हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागरिकत्व आणि घटनात्मक नागरिकत्व यांचा लढा आहे.
‘ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागलं आहे, त्याचप्रमाणे देशालाही ग्रहण लागल आहे. हे ग्रहण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्षाचं आहे. देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारनं सीएए व एनआरसी हे मुद्दे उकरून काढले आहेत. त्यांचा फटका केवळ मुस्लिमांना नव्हे तर देशातील हिंदूंनाही बसणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.