पुणे – केंद्र सरकारकडे अन्न महामंडळाच्या माध्यमातून गहू आणि तांदळाचा साठा उपलब्ध आहे. आता यामध्ये आणखी वाढ करण्यास वाव उरलेला नाही. त्यामुळे यातील काही तांदूळ कमी दरावर बाजारात पाठविण्यावर केंद्र सरकार विचार करीत आहे. त्यामुळे तांदळाची उपलब्धता वाढून दरही कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी गव्हाचा साठा जास्त असूनही गव्हाबाबत मात्र हा निर्णय घेतलेला नाही.
अन्न महामंडळाकडे सध्या 23.1 दशलक्ष टण तांदळाचा साठा आहे. यातील बराच खुल्या बाजारासाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठीची किमान किंमत अगोदर 2 हजार 785 रुपये प्रतिक्विंटल होती. ती आता कमी करून 2 हजार 250 रुपये केली आहे. या दराच्या आधारावर अन्न मंत्रालय निविदा काढून खुल्या बाजारासाठी अन्नधान्याचा पुरवठा करीत असते.
अन्न महामंडळाकडे सध्या 37.3 दशलक्ष टण गव्हाचा साठा आहे. मात्र, हा साठा कमी दरावर उपलब्ध होणार नाही. 1 नोव्हेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार महामंडळाकडे एकूण धान्यसाठा 60 दशलक्ष टन इतका आहे. यावर्षी अन्न महामंडळ 10 दशलक्ष टण गहू गेल्या वर्षाच्या किमान आधारभूत किमती वर म्हणजे 2 हजार 900 रुपये प्रति क्विंटल या दराने उपलब्ध करणार आहे.