नवी दिल्ली – ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात चार महिलांचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते, असे दाखवण्यात आले आहे. यावरून अनेकांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. मात्र एकीकडे या चित्रपटाला काही जण विरोध करत आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटाला काही प्रेक्षकांचा आणि राजकीय नेत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
पश्चिम बंगाल सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेत द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घातलीये. पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय ऐकून अनेकांना मोठा धक्का बसलाय. एकेकडे प्रेक्षक या चित्रपटाला उदंड असा प्रतिसाद देताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये चित्रपटावर थेट बंदी घातली जात असल्याचं दिसत आहे. केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घातल्यानंतर अनेकांनी ममता बॅनर्जी यांना टार्गेट करण्यास देखील सुरूवात केली.
दरम्यान, द केरळ स्टोरी हा चित्रपट बघायला गेलेल्या प्रेक्षकांना पश्चिम बंगालमध्ये धक्के मारून थिएटरच्या बाहेर काढण्यात आल्याची घटना घडलीये. अचानक लोकांना थिएटर बाहेर काढण्यात आले. यामुळे लोकांनी आपला संताप व्यक्त करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी प्रेक्षकांनी थिएटर बाहेर धरणे आंदोलन देखील केले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनी ममता बॅनर्जी यांना टार्गेट केलं आहे.
द केरळ स्टोरी या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.3 कोटींचे कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी 11.22 कोटींचे कलेक्शन केले आणि तिसऱ्या दिवशी 16.60 कोटींचे कलेक्शन केले. विशेष म्हणजे सोशल मीडियावर लोक पोस्ट शेअर करत द केरळ स्टोरी या चित्रपटाला सपोर्ट करताना दिसत आहेत. लोक द कश्मीर फाईल्स आणि द केरळ स्टोरी या चित्रपटांची तुलना का करत आहेत.