नवी दिल्ली – 2014 ला बहुमताने निवडून आलेला भाजप 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यापेक्षाही जास्त संख्येने निवडून आला. यात भाजपाचे योग्य निवडणूक नियोजनाबरोबरच एक चेहरा देऊन प्रचार करण्याची नवीन पध्दत चांगलीच यशस्वी झाली. यातच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाने लक्ष केले असून रविवारी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची नवी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल रणनीतीबाबत चर्चा झाली आहे
Brainstormed on upcoming #MaharashtraAssemblyElections with Hon HM of India, our Rashtriya Adhyaksh Shri @AmitShah ji, Shri @Ramlal ji and senior leaders in New Delhi, with my colleagues from the cabinet, @BJP4Maharashtra President @raosahebdanve ji & team Maharashtra! pic.twitter.com/OxUqKdSRJF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 9, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, बैठकी दरम्यान अमित शहा यांनी म्हटले की, शिवसेनेसोबतची युती विधानसभेसाठी कायम राहिल परंतू मुख्यमंत्री मात्र भाजपचाच हवा फक्त आपल्या जागांवरच नव्हे तर मित्रपक्षाच्या जागेवरसुद्धा विजयासाठी चांगले प्रयत्न करा असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांसह महत्वाचे भाजप नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जवळपास पाऊणतास चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे. तर विरोधी पक्षात या बैठकीमुळे चांगलेच राजकीय घमासान सुरु झाले आहे.