जामखेड -जगाला भेडसावणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी, जामखेड शहरात मात्र बेफिकीर नागरिकांकडून अनेक पातळ्यांवर हरताळ फासण्याचा प्रकार सुरु आहे.
शहरातील बाजारतळात बाजार भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आणल्याने भाजीपाला फिरून विकण्यास सांगितले होते मात्र हा आदेश धुडकावून तपनेश्वर रोड वर बाजार भरवण्यात आला आहे याकडे नगरपरिषदेने साफ दुर्लक्ष केले आहे.
एकीकडे प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्रपरिने प्रयत्न केला जात असताना नागरिकही मोठा प्रमाणावर बाजार करण्यास बाहेर येत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधीक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सर्वांसाठी महत्वाचे असलेल्या गर्दी टाळण्याकडे अनेकांनी पाठ फिरवली असून, शहरातील विविध ठिकाणी नागरिकांच्या टोळ्या जमल्याचे चित्र पहावयास मिळत आहे