नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) बुरखेधारी हल्लेखोरांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असून अनेक बाॅलिवूड कलाकारांनी या घटनेचा निषेध केला. दरम्यान, या हल्ल्याचा निषेध म्हणून अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील (दि. ७) जेएनयूमधील विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना पाठींबा दर्शवण्यासाठी आल्याचे सुद्धा दीपिकाने स्पष्ट केलं होतं.
Gopal Bhargav, BJP in Harda, Madhya Pradesh: Heroine ko toh apna dance karna chahiye Mumbai mein baith ke. JNU mein kyun jana chahiye tha usko, mere samajh nahi aa raha. Is prakar ke darjano log ho gaye hain jo activist, artist kehlate hain. pic.twitter.com/d3QK9u8gKq
— ANI (@ANI) January 9, 2020
दरम्यान, या सगळ्या घटने नंतर भाजप नेते गोपाल भार्गव यांनी बुधवारी दीपिका पादुकोणबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “अभिनेत्रीने मुंबईतच रहावे आणि नाचावे”, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.
“मुंबईमध्ये थांबून अभिनेत्रीने केवळ नाच केला पाहिले. तिला जेएनयूनमध्ये जाण्याची काय गरज होती मला कळलं नाही. स्वत:ला कलाकार आणि कार्यकर्ते म्हणवतात असे डझनभर लोकं हल्ली तयार झाली आहेत”. असं सुद्धा भार्गव यावेळी म्हणाले.