नवी दिल्ली – कोरोनाच्या भीतीने संरक्षणाचा उपाय म्हणून सेल्फ क्वारंटाईन आणि लॉक डाऊनचे उपाय अख्ख्या जगाने स्वीकारले आहेत. त्याचे चटकेही अनेक अर्थव्यवस्था सोसत आहे. मात्र, मानवी वावर कमी झाल्याने कमी तीव्रतेचे भूकंप अधिक अचूकपणे मोजता येत असल्याचे निरीक्षण नासाच्या शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. त्याचबरोबर मानवाचा वावर कमी झाल्याने पृथ्वीचे कवच कमी हालत असल्याचे नमूद केले आहे.
मानवी आवाजाची कंपने जमिनीवर नेहमी आढळत असतात. अनेकदा गरज नसताना त्याची नोंद सेस्मोमिटरवर (भूकंपमापक यंत्र) होत असते. मानवी कृतीमुळे निर्माण होणारी कंपने अत्याधुनिक संवेदनशील सेस्मोमिटरवर नोंदवली जात असतात. मात्र जगभरात लॉकडाऊन जारी केल्याने हा अडथळा बऱ्याच अंशी कमी झाला आहे, असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्यूकेशन अँड रिसर्चचे प्रा, सुप्रिय मित्रा यांच्यासह अनेक भूगर्भ शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे काही बातम्यात छापून आले तसे पृथ्वीचे कवच आता कमी हालत आहे, असे मानणे चुकीचे आहे.
बेल्जीयममध्ये मानवी कृत्यांचे सेस्मोमिटरवर येणारे अडथळे 30 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे त्याचे निकाल इतके छान येत आहेत की, हेच यंत्र पृथ्वीच्या पोटात खोलवर पुरले असावे, असे वाटते, असे मत एका शास्त्रज्ञाने व्यक्त केले.
भारतात या स्वरूपाचा अभ्यास प्रा. मित्रा करत आहेत. लॉकडाऊन नंतरचा डाटा आम्ही संकलित करत आहोत. त्यामूले सेस्मीक आवाजाची पातळी किती कमी झाली, हे समजू शकेल. सांस्कृतिक किंवा पारंपरिक कार्यक्रमात होणाऱ्या एक हर्त्झ येवढ्या आवाजाने भूकंपाची कंपने तयार होत असतात. त्यामुळे हा आवाज जेवढा मोठा तेवढी भूकंप शोधण्याची शक्यता कमी होत जाते. मात्र लॉकडाऊनमुळे वाहनांच्या आणि मानवांच्या हालचाली मंदावल्या आहेत. त्यामुळे असा अडथळा आणणाऱ्या आवाजत कमतरता आली आहे.त्यामुळे लहान भूकंपाची नोंद घेणे शक्य होत आहे.