नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशमधील किन्नोर जिल्ह्यात झालेल्या भुस्खलनामुळे नऊ जण ठार झाले. तर तिघे जखमी झाले आहेत. किन्नौर जिल्ह्यातील बटसेरी जवळ डोंगराचा भाग कोसळल्याने छितकूल येथून सांगला येथे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीवर दरड कोसळली. या घटनेत निसर्गप्रेमी महिला डॉक्टर दीपा शर्मा यांचा दुर्दैवी अंत झाला.
डॉक्टर दीपा शर्मा या जयपूरच्या होत्या. एका उमद्या डॉक्टरच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दरड कोसळल्यामुळे त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला. अपघाताच्या काही तासांपूर्वीच त्यांनी आपल्या हिमाचल सहलीतील एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्यांची ट्विटरवरची ही पोस्ट अखेरची ठरेल यांची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
दीपा शर्मा यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, भारताच्या शेवटच्या टप्प्यावर जिथंपर्यंत नागरिकांना जाण्याची परवानगी आहे. तिथं मी उभी आहे. या पॉइंटच्या पलीकडे जवळपास 80 किलोमीटरवर तिबेटची सीमा आहे. ज्यावर चीननं बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे.
Standing at the last point of India where civilians are allowed. Beyond this point around 80 kms ahead we have border with Tibet whom china has occupied illegally. pic.twitter.com/lQX6Ma41mG
— Dr.Deepa Sharma (@deepadoc) July 25, 2021
किन्नोर जिल्ह्यात झालेल्या भुस्खलनामुळे मरण पावलेल्यांमध्ये दीपा शर्मा यांचा समावेश आहे. डॉक्टर दीपा शर्मा या अतिशय उत्साही, निसर्गप्रेमी आणि पर्यटन प्रिय व्यक्ती होत्या. त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंवरून हे लक्षात येतं.