मुंबई – राज्यात करोना रुग्णसंख्या वाढल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढू लागली आहे. राज्यात काही दिवसांपासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गुरुवारी आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक करोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच, देशात शुक्रवारी ३५,८७० नवे रुग्ण आढळून आले. हा यंदाच्या वर्षीचा, तसेच गेल्या ११० दिवसांतील सर्वांत मोठा आकडा आहे. देशामधून सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झालेली आहे.
देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ७२ टक्क्यांचा वाटा उचलून ठाकरे सरकारने महाराष्ट्रावर नामुष्की आणली आहे. कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्रानं दिल्यावरही ठाकरे सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून हट्टानं हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावलाय. pic.twitter.com/D0h8rlhqNN
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 19, 2021
यातच, कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्रानं दिल्यावरही ठाकरे सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून हट्टानं हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावलाय, असं म्हणत ”ठाकरे सरकराची पोरं हुश्शार…”, असा टोला देखील लगावण्यात आला आहे.
यावरून भाजपने अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून ट्विट ठाकरे सरकारवर जळजळीत टीका केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, ‘देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ७२ टक्क्यांचा वाटा उचलून ठाकरे सरकारने महाराष्ट्रावर नामुष्की आणली आहे. कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्रानं दिल्यावरही ठाकरे सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून हट्टानं हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावलाय.’