मुंबई – मुख्यमंत्री ठाकरेंवरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने मंगळवारी राज्यात वादळी घडामोडी घडल्या. राणेंना जामीन मंजूर झाला झाला असला तरी हे प्रकरण अद्याप निवळलेलं नाही. असे असले तरी दुसरीकडे मात्रआंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया यांनी येत्या काळात ते राणे ठाकरे एकत्र येणार असल्याचे म्हंटले आहे.
नागपूर येतील एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’राज्यातील राजकारण आज पेटले असले तरी उदयाला उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद मिटणार भविष्यात हे दोघेही एका ताटात जेवताना तुम्हाला दिसतील.’
ते पुढे म्हणाले, ‘हे राजकारण आहे. येथे सगळं काही चालतं. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही आज जरी एकत्र नसले तरी ते कधी भांडतील आणि कधी एकमेकांच्या गळ्यात गळे घालतील सांगता येत नाही. हे सुरूच राहणार आहे’