मुंबई : राज्यात अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. एकीकडे कोकणवर आस्मानी संकट आले आहे.
📍महाड
पावसामुळे कोकणवासीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय, परंतु आजवर आलेल्या अनेक संकटातून बाहेर पडलेला कोकणी माणूस आजही धीराने ह्या संकटाला सामोरा जाईल!
ह्या नैसर्गिक संकटकाळात आम्ही तुमच्या सोबत आहोत.@girishdmahajan @niranjandtweets @ithakurprashant @BJP4Maharashtra pic.twitter.com/8UewGwqZjk— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 22, 2021
यावरून आता विरोधी पक्ष नेते यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्रीसाहेब, आता ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार का? असा प्रश्न विचारत ठाकरे सरकावर टीका केली आहे. तर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती निर्माणयाचा फटका कोकणवासियांना बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ते म्हणाले, ‘ठाकरे सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती निर्माण होऊन याचा फटका कोकणवासियांना बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले,’कोकणाला अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. तेथील स्थानिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची विनंती आपण राज्य सरकारकडे केली होती. परंतु सरकारने याविषयी तातडीने कुठलेही गंभीर पाऊल उचलले नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.