मुंबई : गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण अशी म्हणावी लागेल. गेल्या दोन वर्षात उद्योग-गुंतवणूक शेती, पायाभूत सुविधा, पर्यावरण, पर्यटन, वने, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा, अशा प्रत्येक विभागांनी नवनवीन योजना राज्यात राबविल्या हे सांगताना मला आनंद होत, असल्याचं राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं.
या भारतीय प्रजासताकाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात भाषण करताना ते बोलत होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला, असे गौरवोद्गारही कोश्यारी यांनी काढले.
राष्ट्रनिर्माण कार्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. आपलं राज्य देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचं ते म्हणाले. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या प्रयत्नांची दखल संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेने घेतली. नुकताच स्कॉटलंड येथे महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लिडरशिप पुरस्कार मिळाला, याचाही कोश्यारी यांनी उल्लेख केला.