मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी फडणवीस सरकारने आणलेली ‘बळीराजा चेतना योजना’ ठाकरे सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. असे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने बुधवारी जारी केले.
राज्यातील शेतकरी सतत उद्भभवना-या नैसर्गिक आपत्तीने फार खचुन गेला आहे. त्यातुनच एकुन राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या प्रमाण वाढत आहे. हे सर्व थांबावे त्यासाठी शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्या मनामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण करून त्यांना आत्महत्तेपासून परावृत्त करण्यासाठी फडणवीस सरकारने ‘बळीराजा चेतना अभियान’ सुरू केले होते.
यापूर्वी उद्धव ठाकरे सरकारकडून फडणवीस सरकारने केलेली महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना रद्द करण्यात आली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी हे मंडळ स्थापन केले होते.
दरम्यान, आता फडणवीस सरकारची आणखी एक योजना ठाकरे सरकारने रद्द केली. ही योजना शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी योजना तत्कालीन सरकारने आणली होती. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले. त्यामुळे 24 जुलै 2015 रोजी जाहीर करण्यात आलेली ही योजना तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाविकास आघाडी सरकारकडून या योजनेचा आढावा घेण्यात आला. उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात कोणतीही घट झाली नसल्याचे आढळले,एका वृत्तवाहिनेने अशी माहिती दिली आहे.
राज्यसरकाच्या आकडेवारी नुसार, महाराष्ट्रात 2001 ते 2019 या कालावधीत 32 हजार 605 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या तर फडणवीस सरकार असताना 2015 ते 2018 दरम्यान 14 हजार 989 शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे.