लातूर – मराठवाड्यात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात गेली आहे. राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नसून ठाकरे सरकार हे मराठवाडा आणि विदर्भ विरोधी सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
मराठवाड्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. लातूरमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने स्थानिक विकास मंडळाची हत्या केली आहे. मंडळं ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या हक्काची होती. पण, मराठवाड्याला ज्यामुळे न्याय मिळू शकला असता त्याची हत्या करण्याचे काम या सरकारला केले आहे.
आज मोठ्या प्रमाणात शेती पंपाच्या वीज असतील, ग्रामपंचायती अंतर्गत शाळांचे वीज रस्ते घरांच्या विजा तोडण्याचे काम सरकार करत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, विम्याची मदत करावी. मला असे वाटते की, सरकारने मॅजिकल पाहणी केली आहे.
त्याच्या आधारावरच विम्याचे हक्क मिळाले पाहिजे. यासाठी सरकारने तत्काळ लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. सरकारपर्यंत यांचा आवाज पोहोचत नसेल तर सरकारपर्यंत यांचा आवाज घेऊन जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.