पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 19 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबरमध्ये प्रमाणपत्र वाटप होणार आहे.
पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकविण्यासाठी पेपर क्रमांक 1 व सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक 2 या प्रमाणे उमेदवारांच्या परीक्षा घेण्यात आल्या.
पेपर क्रमांक 1 साठी 1 लाख 88 हजार 688 आणि पेपर क्रमांक 2 साठी 1 लाख 54 हजार 596 उमेदवारांची नोंदणी झाली होती. या परीक्षेत एकूण 16 हजार 705 उमेदवार उत्तीर्ण झाले.
करोनामुळे निकाल उशिराने जाहीर झाला. 5 ऑगस्ट रोजी अंतरिम निकाल जाहीर होणार होता. त्यानंतर त्यावर आक्षेप मागवले. दाखल झालेल्या आक्षेपांवर कार्यवाही पूर्ण करून अंतिम निकाल 28 ऑगस्ट रोजी जाहीर झाला.