लंडन – दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक कामगिरीच्या जोरावर भारताने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडचा निम्मा संघ १४९ धावांत माघारी परतला असून भारताला विजयासाठी आता केवळ ४ विकेटची आवश्यकता आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून भारताला मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याची संधी आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत असून पहिला सामना अनिर्णित होता.
शार्दुल ठाकूर व ऋषभ पंतने अफलातून खेळी करत भारतीय संघाला सर्वबाद 466 असा धावांचा डोंगर उभारून दिला. विजयासाठी 368 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. रॉरी बर्न्स (50) आणि हजीब हमीद (63) यांनी १०० धावांची सलामी दिली. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर डेव्हिड मालान (5), ऑली पॉप (2), जॉनी बेअरस्ट्रो (00) आणि मोईन अली (0) एकापाठोपाठ बाद झाले.
जसप्रित बुमराह, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर शार्दूल ठाकूरने एक गडी बाद केला.