मेलबर्न – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुळ क्रिकेट हे कसोटी क्रिकेट आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत टी-20 क्रिकेटचा इतका भडीमार झाला आहे की येत्या काळात कसोटी क्रिकेट जीवंत राहिल का, अशीच शंका येऊ लागली आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक इयान चटॅपेल यांनी व्यक्त केले आहे.
एकेकाळी देशाकडून कसोटी क्रिकेट खेळावे हेच स्वप्न घेऊन नवनवे खेळाडू या खेळाकडे वळत होते, मात्र आज परिस्थिती पाहिली तर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी कोणी इचच्छूकच नसतो. कसोटी क्रिकेट वाचले तरच क्रिकेटचा मुळ गाभा कायम राहिल, असेही ते म्हणाले.