वी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी गटांनी गेल्या पाच वर्षात 2018 मध्ये सर्वाधिक म्हणजे 328 वेळा घुसखोरीचे प्रयत्न केले. त्यापैकी 143 प्रयत्न अयशस्वी ठरले, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे. त्याचबरोबर 2018 -19 मध्ये 257 अतिरेक्यांना टिपण्यात आले. तर 91 जवांना आपले प्राण गमवावे लागले. या काळात दहशतवादी कृत्यांत 39 नागरिकही प्राणांना मुकले.
2017 मध्ये घुसखोरीचे 419 प्रयत्न झाले. त्यातील 136 यशस्वी झाले. तर 2016 मध्ये 371 प्रयत्न झाले त्यात 119 यशस्वी झाले. आंतराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष ताबा रेषा या दोन्ही ठिकाणाहून घुसखोरीचे प्रयत्न झाले. 1990 पासून काश्मिरातील दहशतवाद वाढला त्यात 14 हजार 24 नागरिकांचा तर पाच हजार 273 जणांचा मृत्यू झाला आहे.