यवतमाळ : लॉकडाऊनमुळे देशातील मजुरांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. कोणी पायी तर कोणी लाकडी गाडी करून आपला गाव जवळ करत आहेत. मात्र यात अनेकांना आपला जीव द्यावा लागत आहे. असाच एक भीषण अपघात यवतमाळमध्ये झाला आहे. या अपघातात मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसने टिप्परला धडक दिल्याने हा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 4 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एसटी ड्रायव्हरचाही समावेश आहे. तर 22 जण जखमी आहेत.
Maharashtra: 4 migrant workers killed, 15 injured after a bus they were travelling in crashed into a truck, in Yavatmal, early morning today. The bus was travelling from Solapur to Jharkhand. pic.twitter.com/kEURdmqTOx
— ANI (@ANI) May 19, 2020
यवतमाळच्या आर्णी नजिकच्या कोळवन गावात हा अपघात झाला. सध्या जखमींवर आर्णीच्य गामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस मजुरांना घेऊन सोलापुरहून झारखंडच्या दिशेनं निघाली होती. आर्णी तालुक्यात पहाटे साडेतीनच्या सुमारास मजुरांच्या बसला हा भीषण अपघात झाला. एसटीने मागून टिप्परला धडक दिली असल्यामुळे एसटीच्या पुढच्या भागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जखमींवर आर्णी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ही एसटी सोलापूर येथून मजुरांना घेऊन झारखंडच्या दिशेने जात होती पण दुर्दैवाने वाटेतच हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु असल्यामुळे या रस्त्यावरून टिप्परच्या फेऱ्या सुरु असतात. आजही हा टिप्पर कामाच्या ठिकाणी जात होता. त्यातच हा अपघात झाला.