नाशिक – पुणे राजगुरूनगर येथून नाशिककडे निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. नाशिकमध्ये पोहचलेली असताना या एसटी बसचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचा ताबा सुटला यामुळे ही एसटी दुसऱ्या उभ्या असलेल्या एसटीवर जाऊन जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की,या अपघातामध्ये मामा भाच्याला जागीच प्राण गमवावे लागले.
मृत व्यक्ती दोघेही मूळचे अकोले तालुक्यातील रहिवासी होते. बसच्या धडकेने दोघेही चाकाखाली अडकले त्यातच बसने पेट घेतल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. रवींद्र विसे आणि मदन साबळे अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नाव आहेत. एसटी बसने दुसऱ्या उभ्या असलेल्या बसला धडक देताना मध्ये आलेल्या दोन्हही दुचाकींना चिरडले त्यामुळे बससोबत दुचाकी देखील जळून खाक झाल्या.
या अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले असले तरी इतर ४३ प्रवाश्यांचे जीव वाचले तर २७ जण जखमी झाले आहेत. आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान दाख्वाक्त प्रवाश्यांना जीव वाचवण्यासाठी मदत केली. यावेळी रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.