लखनऊ :उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ,रात्री साडे आठच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सचेंडी पोलिसांनी दिली आहे. जखमींना लाला लजपत राय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
“दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बस पलटली. ही बस लखनऊवरुन दिल्ली जात होती. चार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत,” अशी माहिती कानपूरचे पोलीस निरिक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली. जखमी व्यक्तींनी ते कानापूर जिल्ह्यातील सचेंडी येथील असल्याचे सांगितले आहे. जखमीपैकी अनेकजण हे येथील बिस्कीटच्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला तपास पोलीस करत आहे, असेही मोहित यांनी स्पष्ट केले.
Kanpur: 17 people lost their lives after a collision between a bus and an auto in Sachendi area.
“Four people are undergoing treatment at Hallet hospital. The bus was going to Delhi from Lucknow,” IG Mohit Agrawal says. pic.twitter.com/iuCBSs0Cf0
— ANI UP (@ANINewsUP) June 8, 2021
अपघाताची माहिती मिळताच दोन पोलीस स्थानकातील तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांनी मदतकार्य सुरु केले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी १० जणांचा दाखल करण्याआधीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तर सात जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींची अवस्थाही चिंताजनक असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातासंदर्भात दु:ख व्यक्त करतानाच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
Prime Minister @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh each from the PMNRF for the next of kin of those who have lost their lives due to a tragic accident in Kanpur, Uttar Pradesh. Rs. 50,000 would be provided to those injured.
— PMO India (@PMOIndia) June 8, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री उत्तर प्रदेशमधील अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय मदतनिधीमधून २ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. जखमींना ५० हजारांची मदत केली जाणार आहे,” असे म्हटले आहे.