राजगुरुनगर : खेड तालुक्यात माध्यमिक शालांत( दहावी) परीक्षेसाठी १५ केंद्रावर ५ हजार ९४९ विद्यार्थी बसले आहेत. आज पहिला पेपर देण्यासाठी आणि परीक्षा नंबर शोधण्यासाठी राजगुरूनगर येथील महात्मा गांधी शाळेत विद्यार्थ्यानी वेळेअगोदार मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावरील शिक्षण विभागाकडून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्ड इयत्ता दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्च या कालावधीत होणार आहे. खेड तालुक्यातील सुमारे 80 माध्यमिक शाळांचे 5949 विद्यार्थी परीक्षेला बसले असून आयुष्यातील सर्वात महत्वाचा स्पर्धेला ते उतरले आहेत. करियरच्या पहिल्या परीक्षेचा त्यांच्या चेहऱ्यावर ‘कही खुशी कही गम’ च्या भावना पाहायला मिळाला.