पुणे – राज्यात गेले दोन दिवसांपासून किमान तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे पडणारे धुके, दवामुळे तापमानाचा पारा वेगाने घसरू लागला आहे. राज्यात सर्वाधिक कमी तापमान सोमवारी नगर येथे 14 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून थंड वारे मध्ये व पश्चिम भारतातील राज्याकडे येऊ लागले आहे. किमान तापमानात आणखी 2 ते 4 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. रविवारी कोकणातील अलिबाग, डहाणू, सांताक्रुझ, रत्नागिरीसह सर्वच भागांत तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, मालेगाव, सातारा, सोलापूर येथे तापमानाचा पारा 20 अंशांवर होता. विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमान वेगाने कमी होत असल्याने गारठा वाढला आहे.
पुणे शहरातील तापमानातसुद्धा घट झाली असून सोमवारी शहरातील तापमान हे 16.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.