मुंबई – भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांची अखेर शनिवारी नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली, त्यांच्या जामिनाला विरोध करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळल्यानंतर त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. या प्रकरणात ते गेली अडीच वर्ष कारागृहात होते.
त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एनआयएने त्यांच्या जामीनाला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण सवोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या जामानीच्या निर्णयात कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला.आज दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमाराला त्यांना कारागृहातून बाहेर सोडण्यात आले.
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणानंतर विविध केंद्रीय तपास यंत्रणांनी देशभरातील माओवाद्यांची धरपकड सुरू केली. त्यावेळी 14 एप्रिल 2020 रोजी तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेले कवी वरवरा राव सध्या प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर बाहेर आहेत तर वकील सुधा भारद्वाज नियमित जामिनावर बाहेर आहेत.