पाटणा – लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) खासदार चिराग पासवान यांना दिल्लीतील 12 जनपथ बंगल्यातून बेदखल केल्याबद्दल राष्ट्रीय लोकदलाचे नेते तेजस्वी यादव यांनी भारतीय जनता पक्षाची कडक शब्दात निंदा केली आहे.
रामविलास पासवान यांना केंद्रीय मंत्री म्हणून हा बंगला देण्यात आला होता. त्यांचे निधन होताच चिराग पासवान यांच्या कडून भाजप सरकारने जबरदस्तीने या बंगल्याचा ताबा घेतला, राम विलास पासवान यांनी शेवटपर्यंत भाजपला साथ दिली त्यांच्या निष्ठेचे हेच फळ का, अशी विचारणाही तेजस्वी यादव यांनी केली आहे.
भाजपने हनुमानाच्या शेपटीला आग लावली आहे, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील अशा शब्दात तेजस्वी यादव यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
भाजपच्या यूपी मॉडेलबद्दल विचारले असता, तेजस्वी यादव म्हणाले, “बिहारमध्ये लोकांनी त्यांचे सर्कस मॉडेल पाहिले आहे. यूपी मॉडेल अद्याप समजले नाही. जर बुलडोझर चालवणे हे यूपी मॉडेल आहे, तर ते बेरोजगारीवर बुलडोझर का चालवत नाहीत? योगीजींनी बेरोजगारी, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारावरही बुलडोझर चालवावा असे त्यांनी नमूद केले.