आत्महात्येस प्रवृत्त केल्याप्रकारणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नगर: वेळोवेळी फोन करून तू तुझ्या पत्नीस सोडून देऊन तु माझे घरी राहवयास ये तसेच मला पैसे दे असे म्हणून ब्लॅकमेलींगच्या जाचाल कंटाळून एकाने आत्महात्या केल्याची घटणा नुकतीच घडली आहे.
माळीवाडा येथील जूनी वसंत टॉकीज येथील सागर विलास कानडे (वय-25) असे आत्महात्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत विलास मोहनराव कानडे (वय-51 रा. जुनी वसंत टॉकीच शेजारी ता. नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गौरी किसन जगताप (रा. निमगाव केकती ता. इंदापुर जि.पुणे) हिच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, गौरी हिने सागरला वेळोवेळी फोन करून तु तुझ्या पत्नीस सोडून देऊन तु माझ्या घरी राहवयास ये तसेच मला पैसे दे असे, म्हणून अनेक वेळा ब्लॅकमेकेल केले. यात्रासाला कंटाळून सागरने राहत्या घरात गळास घेवून आत्महात्या केली. मोबाईल मध्ये असलेले मेसेज व युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहुन ठेवलेल्या चिठ्ठीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आत्महात्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे तपास करत आहे.