तिरुअनंतपूरम – भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला आज येथे होत असलेल्या पहिल्या सामन्याने प्रारंभ होत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील ही शेवटची टी-20 मालिका आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
🚨 Toss Update🚨@ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bowl against South Africa in the 1⃣st @mastercardindia #INDvSA T20I.
Follow the match ▶️ https://t.co/L93S9jMHcv pic.twitter.com/z67H1zqdMy
— BCCI (@BCCI) September 28, 2022
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका टी-20 मध्ये 20 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने 11 सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने 8 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.
भारतीय भूमीवर तर याच्या उलट आहे. मायदेशात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नऊ टी-20 सामने खेळले आहेत. टीम इंडियाने यापैकी केवळ तीन सामने जिंकले, तर दक्षिण आफ्रिकेने पाच सामने जिंकले. एक सामना अनिर्णित आहे.
2018 सालापासून भारताविरुद्ध एकही टी-20 सामना दक्षिण आफ्रिकेने गमावलेला नाही, मात्र हाच नकोसा इतिहास बदलण्याची संधी मायदेशातच खेळत असलेल्या भारतीय संघाला मिळाली आहे.