राजकोट :- भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकने संघात कोणताही बदल केलेला नाही.
दुसरीकडे श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने डावखुरा फलंदाज भानुका राजपक्षेला संघातून वगळले आहे. अविष्का फर्नांडोला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले आहे.
भारत : इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
#TeamIndia have won the toss and elect to bat first in the third and final T20I.
We go in with an unchanged Playing XI.
Live – https://t.co/bY4wgiSvMC #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/SDfhNlastc
— BCCI (@BCCI) January 7, 2023
श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), अविष्का फर्नांडो, धनंजया डी सिल्वा, चरित अस्लांका, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महिष तेक्षाना, कसून रजिथा, दिलशान मदुशंका.
One change for 🇱🇰
Avishka Fernando replaces Bhanuka Rajapaksa. 🔄#INDvSL pic.twitter.com/eEfHmHDhtk
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) January 7, 2023
दरम्यान, भारत व श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना होत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने मालिका कोण जिंकणार हे या सामन्यातील निकालाने स्पष्ट होणार आहे.