मुंबई – भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात येत्या गुरुवारपासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत असून त्यापूर्वी भारतीय संघाची वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्ट केले आहे. आता ही चाचणी तंदुरुस्तीची आहे की करोना विषाणूंबाबत याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
एखाद्या मालिकेसाठी संघ निवड होण्यापूर्वी खेळाडूंची चाचणी घेण्यात येते. मात्र, संघ निवड झाल्यानंतर चाचणी घेण्यात येणार असल्याने ही चाचणी कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, एकदिवसीय तीन सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. मात्र, करोना विषाणूंचा धोका असल्याने प्रत्यक्ष सामन्यात त्यांनी कोणालाही शेकहॅण्ड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.