आॅकलंड : न्यूझीलंडविरूध्दचा पहिला टी-२० सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला. विजयासाठीचे २०४ धावांचे लक्ष्य भारताने ४ गडी गमावत १९ षटकात पूर्ण केले. यासह भारताने या सामन्यात एक विक्रम केला. भारताने टी-२० क्रिकेटमध्ये चौथ्यांदा दोनशेहून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केले.
It’s in the bag! 👏👏@ShreyasIyer15's 5⃣8⃣*, @klrahul11's 5⃣6⃣ and @imVkohli's 4⃣5⃣ take #TeamIndia home. #NZvIND pic.twitter.com/B0nqmWiqMr
— BCCI (@BCCI) January 24, 2020
यापूर्वी, २००९ मध्ये मोहालीला भारताने श्रीलंकेविरूध्द २०७ धावांचे, २०१९ मध्ये हैदराबादला भारताने विंडीजविरूध्द २०८ धावांचे , २०१३ मध्ये राजकोटाला भारताने आॅस्ट्रेलियाविरूध्द २०२ आणि आता (२०२० मध्ये) न्यूझीलंडविरूध्द २०४ धावांचे लक्ष्य यशस्वी पूर्ण केले.
तसेच टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाने प्रथमच परदेशात दोनशेहून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या पार केले.