नवी दिल्ली – आपण मुलांना कॉन्व्हेंटच्या शाळेत शिकवतो त्यामुळे ते पुढे जाऊन गोमांस खातात, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. तसेच शाळांमध्ये मुलांना भगवतगीता शिकवायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.
गिरीराज सिंह यांनी म्हंटले कि, शाळांमध्ये मुलांना भगवतगीता शिकवायला हवी. मात्र, आपण मुलांना कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये पाठवतो. त्यानंतर ते आयआयटीमध्ये शिकतात आणि इंजिनिअर होतात. नंतर परदेशात जाऊन त्यांच्यापैकी बहुतेक जण गोमांस खातात, का? कारण आपण त्यांना आपली संस्कृती आणि पारंपारिक मुल्ये शिकवत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
Union Minister Giriraj Singh: Bhagavad Gita should be taught in schools,we send our children to missionary schools, they get through IIT,become engineers,go abroad and most of them start eating beef.Why? Because we did not teach them our culture and traditional values. (1.1.20) pic.twitter.com/p5zHWfY3Uo
— ANI (@ANI) January 2, 2020
दरम्यान, गिरीराज सिंह हे कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी त्यांनी गोमांस संबंध कॉन्व्हेंटच्या शाळेशी जोडल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.