डॉ.राजू गुरव
पुणे – पुणे शहराच्या विविध भागांत करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणासह इतर कोणत्या ना कोणत्या कामांची कारणे पुढे करून शाळा मनमानी करत शिक्षकांना शाळांमध्ये ळजबरीने बोलावू लागले आहेत. यामुळे शिक्षकांचा जीव धोक्यात आलेला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या संधित शाळांवर कारवाई होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
शहरात महापालिका, खासगी अनुदानित व खासगी विनाअनुदानित शाळांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. करोनाचा प्रसार वाढल्याने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे साडेतीन महिन्यांपासून शाळा ंदच ठेवण्यात आलेल्या आहेत. करोनाचे रुग्ण आढळलेले भाग प्रतिंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. या भागात कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत.
राज्य शासनाने लॉकडाऊमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने अद्यापपर्यंतकोणतेही आदेश जारी केलेले नाहीत. तरीही हुसंख्य शाळांनी आपली बंद कुलुपे उघडली असून हळूहळू कामकाज सुरु केल्याचे चित्र आढळून येऊ लागले आहे. यात प्रतिंधित क्षेत्रासह इतर ठिकाणच्या शाळांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी तयारी करणे, विद्यार्थ्यांकडून फी वसूली करणे, शैक्षणिक वर्षाची पूर्व तयारी करणे, विविध प्रकारची रजिस्टर अपडेट करणे, विद्यार्थ्यांचे निकालाची अपूर्ण कामे पूर्ण करणे आदी विविध कामांचे निमित्त करून शिक्षकांना बोलाविण्याचा धडाका शाळांनी लावला आहे.
करोनामुळे शिक्षकांमध्ये आधीच भिती निर्माण झालेली आहे. त्यातच शाळा बोलावू लागल्यामुळे मोठ संकटच उभे राहिले आहे. खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना दोन-तीन महिन्यापासून पगारही मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा कठीण प्रश्न निर्माण झालेला आहे. बस, रिक्षा वाहतूक पुरेशा प्रमाणात सुरु झालेली नसल्याने शाळांमध्ये कसरत करत शिक्षकांना जावे लागत आहे.
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याबाबतचे कामकाजही महापालिकेने सुरू ठेवले आहे. बालभारतीकडून आलेली पुस्तके नागरी साधन केंद्रातून शाळांना वाटप केली जात आहेत. शाळांमधून ती पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या सर्व कामांचा भारही शाळांनी शिक्षकांवरच टाकलेला आहे. पुस्तक वाटपाबरोबरच शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेला तांदूळही वाटप करण्यासाठी शिक्षक घाबरले आहेत.
शिक्षकांची डोकेदुखी वाढतेय
विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांकडून विविध प्रकारचे ई-साहित्य उपलब्ध करून देण्याचे बंधनही शाळांकडून घालण्यात आले आहे. दररोज विषय, वर्गनिहाय व्हिडीओ तयार करण्यात शिक्षकांना खूप वेळ द्यावा लागत आहे. विविध प्रकारचे तयार केलेले ई-साहित्य मुख्याध्यापकांकडून तपासून घेण्यासाठीही शिक्षकांना वारंवार शाळेतही बोलाविले जात आहे. विद्यार्थ्यांचे व्हॉटसअप ग्रुप तयार करुन त्यावर सतत ई-साहित्यासह विविध सूचना पाठवाव्या लागत आहे. विद्यार्थ्यांना होम वर्क पाठवून त्याची ऑनलाइन तपासणीही करावी लागत आहे. यामुळे शिक्षक हैराण होऊ लागले आहेत. शाळांच्या मनमानी कारभाराबाबत शिक्षक संघटनाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.