नमस्कार वाचक मित्रांनो, आज 5 सप्टेंबर डॉ. राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस. एक अध्यापक, एक प्राध्यापक एक आचार्य या नात्याने आपण शिक्षकदिन म्हणून साजरा करीत असतो. सर्व गुरुजनांना मनापासून वंदन करण्याचा आजचा हा दिवस. आज आपण जे काही आहोत ते आपल्या गुरुंमुळेच. आज आम्ही गेली 12-15 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत आहोत. ते आपल्या शिक्षकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच असे बरेच शिक्षक आम्हाला लाभले. शालेय जीवनात आमच्यावर ज्यांनी संस्कार केले, ज्ञानामृत पाजले, जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली, असे मुख्याध्यापक, श्री. नवनाथ तोत्रे सर, विलास गायकवाड सर, प्रा. संतोष जोशी सर, ह.भ.प. बाळासाहेब वाडेकर सर, श्री. आनंद मोहिते सर, श्री. दिनेश गुंड सर, सौ. आत्तार मॅडम, सौ. सातपुते मॅडम, श्री. यादव सर, श्री. चव्हाण सर, श्री. मुंगसे सर, प्रा. जगताप सर, नेने सर, श्री. प्रकाश मिरजकर सर, बिबवे मॅडम, पलांडे सर, पारेख मॅडम आणि व्यवसायी जीवनात पाठीशी खंबीरपणे उभे राहून योग्य वेळी मार्गदर्शन करणारे संस्थेचे आधार स्तंभ मा. श्री. संभाजीशेठ गवारे यासारख्या अनेक ज्ञात आणि अज्ञात गुरुंमुळे आमचे आयुष्य घडले. या सर्वांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.
शि म्हणजे – शिलवान
क्ष म्हणजे – क्षमाशिलता
क म्हणजे – कर्तव्यनिष्ठ
शिक्षक, गुरू, सर मास्तर, मार्गदर्शक दिशादर्शक ज्ञानदाता अशी अनेक बीरुदं ज्यांच्या नावासमोर कायम सुवर्ण अक्षरानं आयुष्याच्या ताम्रपटलावर कोरलेली असतात ना, ती माणसं आयुष्यभर आपल्या समाजासाठी यशाचे मार्ग तयार करत असतात. “उन्हात खेळू नको इकडे सावलीत मर…’ असे पोटतिडकीने सांगणारी आईच आपला पहिला गुरू. आई सुमनताई गवारे व आई अलकाताई पवळे यांनी शिकविली जगण्याची बाराखडी. जगण्यापासून ते मरण्यापर्यंत न थांबता हळूहळू गुढघ्यावर येऊन चालायला लागलो, तेव्हा दोन्ही हात घट्ट पकडून विश्वासाने उभा राहा असे म्हणणारा बाबा आयुष्यभर त्याच विश्वासाने पकडून असतो आपल्याला. वडील श्री. बबनराव गवारे व वडिल एकनाथ पवळे यांनी भरले आमच्या पंखात बळ, यांनी शिकवले दुनियादारीचे गणित आणि माणुसकीची आकडेमोडसुद्धा फक्त चेहरा पाहून लेकराला काय झालं, हे ओळखणारे मायबाप या जगातील निसर्गाची सर्वात मोठी कलाकृती आहे. आई-वडिलांइतकाच आम्हाला जीव लावणाऱ्या, योग्य वेळी मार्गदर्शन करणाऱ्या सौ. सुनिता नाटक, सौ. नंदाताई येवळवंडे, सौ. रुपाली पवळे, सौ. चंदाताई पवार या बहिणीही गुरुसमान. शिक्षकाचे अनुकरण विद्यार्थी करीत असतात आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे की, थश ुरपीं लहरीरलींशी ारज्ञळपस शर्वीलरींळेप आम्हाला चारित्र्य निर्माण करणारे शिक्षण हवे आहे. या चारित्र्याचा शिल्पकार असतो शिक्षक. दगडाला देवपण येतं पण ती कला पाथरटाच्या हाता असते. “कुंभारासारखा नाही जगी गुरू थोर, आतून प्रेमाचा आधार वरून चापटीचा मार’ शिक्षकाच्या बाबतीत ही ओवी तंतोतंत लागू पडते. महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक व्ही.व्ही. चिपळूणकर सर यांनी शिक्षकांसाठी अतिशय सुदंर अशी प्रतिज्ञा केली आहे.
मी एक शिक्षक,
अध्ययन-अध्यापन हा माझा स्वधर्म
शाळा हे माझे मंदिर
आणि विद्यार्थी हे माझे दैवत
चारित्र्य हा माझा अलंकार,
धडपड ही माझी पूजा
दुरितांचे तिमिर जावो,
ही माझी प्रतिज्ञा आणि
समाजाचे आशीर्वाद
हाच माझा प्रसाद
श्री समर्थ संकुलात अध्यापनाचे काम करणाऱ्या माझ्या अध्यापक वर्गाचे काम हे वाखाणण्याजोगे असते. त्यात प्रामुख्याने विद्यालयाची प्रशासकीय व शैक्षणिक जबाबदारी अतिशय उत्तमरित्या सांभाळणाऱ्या प्राचार्या अनिता वसंत टिळेकर मॅडम. “गुणवत्तेशी तडजोड नाही’ हा बाईंचा खाक्या. विद्यार्थी व शिक्षक या दोघांच्याही गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम त्या आवर्जून राबवतात. प्रदीर्घ अनुभव गाठीशी असल्यामुळे योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची क्षमता व उद्भवलेली समस्या लगेच सोडविण्यात प्राचार्यांचा हातखंडा आहे. प्राचार्या विद्या पवार, प्राचार्या मयुरी बिरदवडे, प्राचार्या सपना टाकळकर, पर्यवेक्षिका शोभा तांबे, मोलानी मुंगसे, अश्विनी देवकर, वंदना यादव, अजित थोरात, रुपाली सपकाळ यांसह नर्सरीपासून ते इ. 12 वी पर्यंत सर्व शिक्षक वर्ग अतिशय सुंदर पद्धतीने मुलांना घडविण्याचे काम करत आहे. लॉकडाऊनच्या कालखंडातही श्री समर्थचा शिक्षक अनेक समस्यांवर मात करत ज्ञानदानाचे कार्य पार पाडीत आहे.
“अतृप्त नदी जशी इतरांची तहान भागवू शकत नाही. तसा, “रिता’ शिक्षकही विद्यार्थ्यांना भरू शकत नाही. तो व्यासंगी असेल, बहुश्रुत असेल तरच तो मुलांना काही देऊ शकतो ही अध्यक्ष शिवाजीराव गवारे सरांची असलेली अपेक्षा. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व माझा शिक्षक गुणवंत शिक्षक होण्यासाठी विविध उपक्रम शाळा स्तरावर राबवले जातात. शिक्षक गुणवंत तर विद्यार्थी गुणवंत यावर माझा विश्वास आहे.
माझ्या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनूूनच बाहेर पडावा, यासाठी आम्ही आग्रही असतो. नेहमी ज्ञानाची तहान असते तो शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहतो. तो शिक्षक, नेहमीच घडतो अन् विद्यार्थ्यांना घडवितो.
आपले व्यक्तिमत्त्व घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा सहभाग असतो. अशा या शिक्षकी पेशाचा मला अभिमान आहे. श्री समर्थ स्कूल ऍण्ड कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यास मला सार्थ अभिमान वाटतो. शिक्षक म्हणून घडत असताना मा. श्री. शिवाजीराव गवारे सर व सचिव सौ. विद्याताई गवारे मॅडम गुरुतुल्य दाम्पत्यांचे मार्गदर्शन नेहमी प्रेरणा देत राहील. अध्यापनाचे पवित्र काम करणाऱ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
– अनिता टिळेकर (प्राचार्य, श्री समर्थ स्कुल ऍण्ड कॉलेज, चिंबळी फाटा)
One child, one teacher, one pen and one book can change the world’ is a quote by the daughter of a teacher Malala Yousafzai. Rightly so, teachers are the first guiding step in this big bad world. Without a mentor over our heads, a guide to distinguish right from wrong, we all will be the bodies without spirit. While growing up, the only person we lend respect after our parents are out teachers; because the greatest lessons we learn in the classroom. Even though many times we feel that they are a waste, but somewhere after a decade everything starts coming into particularly and hence our bookish lesson come to life.
Teachers may not always be confined to the four walls of a school. They may come in the form of your parents sibiling soulmate, friends of simply campanion like your dog. The small moments with this special people in our lives after the spellbound with the lessons. We may never land otherwise. This Teacher’s Day, do not just thank your `on paper’ teachers; thank everyone who have contributed in making you. Not every teacher needs to be called ‘madam or sir’ and not every teacher needs a stick to teach you a lesson. Experiences with certain people offen turn out to be our greatest teachers and should be cherished. I strongly feel there are three key social members who can make a difference they are father, mother and teachers.
– Vidya Pawar (Principal Kharabwadi branch Teachers Day Speech)
गुरुजी बाई मॅडम मिस टीचर काही आणि कोणतेही संबोधन वापरले तरी शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीचे महत्त्वाचे योगदान प्रत्येकाच्या आयुष्यात होत असते आणि राहणार आहे पारंपरिक शिक्षण पद्धती असो किंवा आजची ऑनलाइन शिक्षण पद्धती असो शिक्षक या घटकाचे महत्त्व ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गवारे सर चिटणीस गवारे मॅडम मुख्याध्यापिका टिळेकर मॅडम यांच्या सहकार्याने मी माझ्यातील शिक्षिकेला आणखी उत्कृष्ट घडवण्याचा प्रयत्न करीत आहे सर्व शिक्षक बंधू-भगिनींना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. – तेजश्री लगड, शिक्षिका
समाजाचे शिल्पकार म्हणजेच शिक्षक होत. चांगले शिक्षण कोणालाही बदलू शकते. परंतु एक चांगला शिक्षक सर्व काही बदलू शकतो. म्हणूनच शिक्षकाला राष्ट्रनिर्माणकर्ता म्हणतात. विद्यार्थ्यांना जगण्याच्या सर्व कलांत पारंगत करणे आणि समाजात सभ्य व संस्कारशील नागरिक म्हणून वावरतील असे शिक्षण देणे हे शिक्षकाचे कर्तव्य असते. हेच कर्तव्य पार पाडण्याची संधी ज्यांनी दिली, ते म्हणजे श्री समर्थ स्कूल व कॉलेजचे संस्थापक मा. श्री. शिवाजीराव गवारे सर व सचिव मा. सौ. विद्याताई गवारे यांची मी मनापासून आभारी आहे.
– अंकिता बोरकर, शिक्षिका
शिक्षक म्हणजे एक समुद्र… ज्ञानाचा पवित्र्याचा… शिक्षक अपूर्वाला पूर्ण करणारा… शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढविणारा… शिक्षक तत्वातून मूल्ये फुलवणारा… ध्येय दिसते तेथे नेतो शिक्षक… सत्य ते शिकवतो, वदवून घेतो तो शिक्षक… अन्नदानाहूनही श्रेष्ठ असणारे दान म्हणजे ज्ञानदान होय… शिष्याच्या सर्व चुका पोटात घालून त्याला माफ करणारा शिष्याला जीवन जगण्याची कला शिकवणारा शिक्षक. सध्या करोनाच्या काळात शिक्षक-विद्यार्थी दूर असले तरी मनाने तेवढेच जवळ आले आहेत. दोघांचीही एकच इच्छा ही लवकरात-लवकर करोनाची महामारी संपावी व पहिल्यासारखी शाळा चालू व्हावी. मुलांचीही चिवचिवाट शाळेत पुन्हा ऐकायला मिळावा हिच शिक्षक दिनानिमित्त इच्छा व अपेक्षा.
– सौ. मयुरी बिरदवडे, प्राचार्य
श्री समर्थ स्कूल, निघोजे
अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया। चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः’ या ओवीप्रमाणे शिक्षक हे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला शिक्षण रुपी प्रकाश दाखवतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांच महत्वपूर्ण स्थान असतं. कुंभार जसा मातीला चांगला आकार देत सुबक मडकी घडवितो, त्याप्रमाणे माझ्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार करत मला घडवल, अजूनही घडवत आहे. ते मला उत्तम मार्गदर्शन करतात शिक्षकांनी दिलेला अभ्यासाचा, शिस्तीचा व चिकाटीचा मंत्र जपत मी चाललो आहे. जीवनात चांगला माणूस व्हायचं आहे . शिक्षणक्षेत्रात संगणकीय तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांना घडवायचं माझ स्वप्न आहे.
– निखिल कांबळे, वरिष्ठ लिपिक तथा संगणक प्रशिक्षक
शिक्षक एक अशी व्यक्ती जी मुलांना मायेने जवळ घेते तेव्हा ती आई बनते विद्यार्थ्यांनी चूक केली तर वडिलांच्या हक्काने ओरडून त्यांना योग्य मार्गावर आणते आपल्या विद्यार्थ्याने जर परीक्षेत किंवा क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले तर शिक्षकाच्या चेहऱ्यावरील आनंद जगातील कोणत्याही एककात मोजतात येणारा असतो आयुष्याच्या जन्म पटलावर तो एक कलाकार नाटक करण गायक संगीतकार वक्ता समाजसुधारक रक्षक आणि लोखंडाचे सोने करणारा परीस अशा अनेक नानाविध भूमिका बजावत असतो हे सारं तो करत असतो फक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठी.
– सौ. सपना टाकळकर,
प्राचार्य श्री समर्थ स्कूल केळगाव
सर्व गुरुजनांना वंदन करण्याचा आजचा हा दिवस कोविड-19 च्या महाभयंकर परिस्थितीतही अध्यापनाचे कार्य न थांबता अविरतपणे करणाया माझ्या शिक्षक बंधू-भगिनींना श्री समर्थ ग्रुपच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
– रेश्मा संदीप पवार, ग्रंथपाल
काळाची गरज ओळखून आमची श्री समार्थ स्कूल अँड कॉलेज ही शिक्षणसंस्था नेहमीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते. त्याचा मला सार्थ असा अभिमान आहे.
– रूपाली चेतन सपकाळ, शिक्षक
मी एक शिक्षिका असून गेल्या चार ते पाच वर्षापासून मी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. शिक्षिक म्हणजे समाज घडवणारा एक घटक असतो.
– सायली मालापुरे
नावीन्याचा ध्यास असलेली श्री समर्थ शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून सतत प्रयत्नशिल असून मी या संस्थेचा एक भाग आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. – आश्विनी देवकर, (पर्यवेक्षिका खराबवाडी)
गुरुविण न मिळे ज्ञान । ज्ञानाविण न होई लगी सन्मान
जीवन भवसागर तराया चला वंदू गुरुराया
शाळेच्या पहिल्या दिवशी मा. श्री. धोंडे सर यांनी दिलेल्या शिक्षणापासून ते आजपर्यंत शिक्षण देत असलेल्या सर्व शिक्षकांमुळे आयुष्याची जडणघडण ही सुसंस्कारी होत आहे. श्री समर्थ स्कूल ऍण्ड कॉलेज या संस्थेत ज्ञानदानाने कार्य करताना खुप आनंद वाटतो. संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव बबनराव गवारे, सचिव सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे व मुख्याध्यापिका सौ. अनिता टिळेकर हे सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांच्या समस्या सोडवून मोलाचे मार्गदर्शन करतात. त्यामुळे ज्ञानदानाचे कार्य करताना योग्य दिशा मिळते. म्हणून माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा! – भाडळे मोनाली अतुल, सुपरवायझर
मातीचा लहानसा गोळा होते, सुंदर आकार दिला तुम्ही।
निस्तेज अशा ताऱ्यांना, स्वत:चा प्रकाश दिला तुम्ही।।
हाताला धरून अक्षर, गिरवायला शिकवले तुम्ही।
पंख होते कमजोर, उडायला बळ दिले तुम्ही।।
शिकवलेल्या गोष्टीतून, आजही दिसता तुम्ही।
तुम्ही नसता गुरूजी तर, घडलोच नसतो आम्ही।।
ज्याप्रमाणे कुंभार एका मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर कलाकृती बनवतो त्याचप्रमाणे एक शिक्षकही निष्पाप अशा असंख्य बालमनांवर संस्कार करून त्यांना घडवत असतात. सध्याच्या करोना परिस्थितीला विद्यार्थी मोठ्या धीराने सामोरे जात आहेत. शिक्षक हा व्यवसाय न समजता हे एक सेवाभावी कार्य आहे, असे मानून या सेवाभावी वृत्तीतूनच श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण व संवेदनशील सुशिक्षित नागरिक बनावेत यासाठी श्री समर्थ स्कूल व कॉलेज गेली 10 वर्षे अविरत कार्य करत आहे. संस्थेच्या या देशसेवेच्या महान कार्यात मलाही खारीचा वाटा उचलण्याची संधी दिली यासाठी मी, संस्थापक, श्री. शिवाजीराव गवारे सर, सचिव विद्याताई गवारे मॅडम व मुख्याध्यापक सौ. टिळेकर मॅडम यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. श्री समर्थ ग्रुपमध्ये मी एक शिक्षक म्हणून कार्य करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! -शोभा जी. तांबे, पर्यवेक्षिका
मला श्री समर्थ स्कूलमधून खूप काही शिकायला मिळाले. इथे विद्यार्थ्यांच्यां व शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळतो. करोना संकटात समाजव्यवस्थेत आपल्याला मोठे बदल पहायला मिळत आहे. डिजिटल म्हणजेच ऑनलाईन शाळा हा त्यापैकी एक. मुले आता लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोन समोर बसलेले दिसतात. -प्रिती गायकवाड, शिक्षिका
विद्वत्ता, मांगल्य व पावित्र्य असलेल्या या क्षेत्रात ज्ञानदानाचे कर्म करताना आपण देशहीताचे काम करत आहोत ही भावना जागृता होते. ज्ञानदिंडीचे मानकरी, शांतीनिकेतन साकारणारे कविवर्य रविंद्रनाथ टागोर, आत्मबळाचे शिक्षण देणारे स्वामी विवेकानंद, ब्राम्हो समाजप्रणित शिक्षणाचे प्रसारक राजाराम मोहन रॉय, दुर्बलांच्या शिक्षणाची चिंता करणारे महात्मा ज्योतिबा फुले, आनंददायी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या ताराबाई मोडक, अबलांच्या शिक्षणासाठी सर्वस्व वेचणारे महर्षी धोंडो कर्वे, मुलोद्योगी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा गांधी, त्यास मूर्तरुप देणारे डॉ. झाकीर हुसेन, लोककल्याणकारी शिक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, रयतेच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा नेणारे कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणारे साने गुरुजी, बाबुराव घोलप, केशवराव जेधे. हाच वारसा पुढे घेवून जाणारे आपण सर्वजण वारकरी आहोत. याचा आम्हांस सार्थ अभिमान आहे.-अजित सिताराम थोरात (पर्यवेक्षक,चिंबळीफाटा)
आज का दिन कहे तो शिक्षक दिवस वैसे तो सच्चे अध्यापक के लिए हर एक दिन “शिक्षक दिवस’ जैसा होना चाहिए। एक आदर्श अध्यापक के विचार सकारात्मक एवं आशावादी होने चाहिए, ताकी विद्यार्थी अपने भविष्य को लेकर कभी निराश न हो। उसमे प्रेरणा देणे का ऐसा जज्बा हो की एकदम उदासीन विद्यार्थी भी पढने -लिखने को प्रेरित हो जाए। और हम नमन करते है उन्हे आरणीय डॉ. राधाकृष्णन को कि जिन्होने शिक्षकपद की गरीमा को नई परिभाषा दी अध्यापक शिक्षक प्रक्रिया का सबसे महत्त्वपूर्ण अंग है। एक आदर्श शिक्षक वह होता है जो अपने शिक्षक पद के लिए अपने आप को समर्पित करता है। मुझे गर्व है कि मै खुद एक अध्यापिका हू और मै एक आदर्श शिक्षक बनने के प्रयत्न मे प्रयत्नरत रहूंगी। धन्यवाद!
शि – शिखर तक ले जाने वाला।
क्ष – क्षमा की भावना रखनेवाला।
क – कमजोरी दूर करने वाला।
-वंदना यादव
श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या एकूण 5 शाखा असून 250 शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. 3500 विद्यार्थी शिक्षण संकुलात शिक्षण घेत आहे. श्री समर्थच्या प्रांगणात मल्लखांब, कराटे, स्केटींग, योगा, संगीत, तबला, हार्मोनियम, पियानोवादन, गिटार वादन. स्कॉलरशिप परीक्षा ऑलंपियाड परीक्षा च.ढ.ड परीक्षा, सायन्स लॅब, कंप्युटर लॅब, ग्रंथालय, आरएसपी (ठ.ड.झ.) स्काऊट अँड गाईड, ढोलताशा पथक एश्रशाशपीीूं रपव खपींशीाशवळरींश शुरा हिंदी राष्ट्रभाषा यासारखे विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारे उपक्रम राबविले जातात. बदलत्या युगामध्ये आपल्या विद्यार्थी टिकावा त्याला तंत्रानाची ओळख व्हावी यासाठी सुसज्ज संगणक कक्ष, अद्ययावत प्रयोग शाळा. कॉम्प्युटर सायन्स लॅब, क्रॉप सायन्स लॅब विद्यार्थ्यांसाठी खुले केले आहे व या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम श्री समर्थचे शिक्षक वृंद करीत आहेत. श्री समर्थ संकुलामध्ये शिक्षकांचा गुणगौरव करण्याची एकही संधी सोडली जात नाही. आजचा दिवस तर खऱ्या अर्थाने त्यांना पुजण्याचा दिवस. गुणवंत, क्रियाशिल व कृतिशील शिक्षक संस्थेला लाभले आहेत.
शब्दांकन – सुनील बटवाल, चिंबळी