इंदोर– इंदोरजवळीत बिजापूर या एका लहान गावातील मुख्याध्यापकांनी विद्यार्थांचं विमानात बसण्याचं स्वप्न स्वखर्चातून पुर्ण केलं आहे. किशोर कणसे असं या मुख्याध्यापकांचं नाव आहे.
कणसे यांनी त्याच्या शाळेतील सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनना इंदोर ते दिल्ली असा विमान प्रवास घडवला. या प्रवासाला कणसे यांनी बचत केलेल्या पैशातून विद्यार्थ्यांना हा विमान प्रवास घडवला. त्यामुळे विद्यार्थांना फार आनंद झाला होता. आम्ही नेहवर्गात कागदाची विमानं करुन उडवायचो किंवा आकाशात विमानाचा आवाज आला की फार कौतक वाटायचं, असं विद्यार्थांनी सांगितलं.
दरम्यान, एक वर्षा आधी एका विद्यार्थ्याने विमानातून सहल करायची ईच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे कणसे यांना ही कल्पना सुचली.