लडाखमध्ये गलवान खोऱ्यामध्ये भारत-चीन सैन्यात झालेल्या चकमकीत भारताचे ३ जवान शहीद झाले आहेत. या घटनेमुळे भारत-चीन सीमावाद पून्हा एकदा चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी घडलेल्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करत चीनला कशाप्रकारे धडा शिकवायला हवा हे सांगितले आहे.
लडाख येथे भारत आणि चिनी सैन्य यामध्ये झालेले चकमक ही गंभीर घटना आहे. यामध्ये भारतीय सैन्याच्या अधीकारी आणि जवान यांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे. गेल्या दीड महिन्यापासून चिनी सैन्याची आक्रमकता लक्षणीयरीत्या वाढली आहे. मात्र भारतीय सैन्य याला तोंड देण्यास सक्षम असून, योग्य सैन्यातर्फे योग्य ती कारवाई केली जाईल, याची मला खात्री आहे. मात्र भारतीय म्हणून आपली जबाबदारी आहे, की आपण चिनी मालावर बहिष्कार करून चीन’ला धडा शिकवला पाहिजे. ही वेळ प्रत्येक भारतीयाने एकजुटीने ही मोहिम अंगीकरत, भारतातून चिनी माल हद्दपार करणे ही काळाची गरज आहे.