नगर – राज्य व केंद्र सरकारकडुन सध्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 सुरु असून यामध्ये नगर शहरातील नागरिकांचा सकारात्मक सहभाग मिळावा या करीता हरियाली संस्थेकडुन दररोज चाय पे चर्चा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून स्वच्छतेबाबत व स्वच्छ सर्वेक्षण -2020 बाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
या सर्वेक्षणातील मुल्यमापन 6000 मार्कासाठी होत असून त्यामध्ये 1500 मार्क नागरीकांच्या प्रतिक्रियेसाठी आहेत. या प्रतिक्रिया फोन वरुन, प्रत्यक्ष भेटीत व मोबाइल अँपवरुन दि.31 जाने पर्यंत प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत.यामध्ये ते नागरीकांना सात प्रश्न विचारणार असून या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक दिले तरच मार्क मिळणार आहेत. म्हणून या विषयी व्यापक जनजागृती होण्याकरीता चाय पे चर्चा या उपक्रमाचे आयोजन करुन नागरीकांशी चहा पित सहज संवाद साधला जात आहे,असे हरियालीचे अध्यक्ष तथा स्वच्छतादुत सुरेश खामकर यांनी सांगितले.
नगर शहरातील विविध भागातील चाहाच्या ठेल्यावर (टपरी) लोक चहा पिण्यासाठी सहजपणे एकत्रीत येतात. त्यावेळी त्यांच्याशी चहा पिता पिता स्वच्छ सर्वेक्षण विषयी मनमोकळी चर्चा करुन त्याचे मत सकारात्मक करण्यात येत आहे. महापालीकेकडून उपलब्ध झालेले सात प्रश्न व त्यांची उत्तरे असलेले पत्रकेही नागरीकांनां देण्यात येत आहेत. सर्वच प्रश्नांची उत्तरे सकारात्मक देण्यासाठी त्यांना आग्रह धरुन आवाहन या चर्चेवेळी करण्यात येत आहे. फोन कॉंलवरुन नागरीकांनी प्रतिक्रिया द्यावी यासाठी 1969 या नंबरवर मिस कॉंल देण्यास सांगितले जात असुन मिस कॉंल दिल्यानंतर प्रतिक्रियेसाठी एक अंक दाबण्यास सांगितले जाते.
या प्रक्रीयेनंतर पाच सहा दिवसांनी फोन येतो .त्यावेळी सकारात्मक प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. या बरोबरच प्लास्टिक व कचराकुंडी मुक्त नगर या विषयीही चाय पे चर्चा या उपक्रमात व सोशल मीडिया वरुन चर्चा करुन आपले नगर -स्वच्छ शहर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. या उपक्रमात हरियालीचे सुरेश खामकर, सौ हेमा तवले, बबन खरमाळे, शरद जाधव, भरत काळे, माजीद शेख, शुभम वाणे, संतोष गायकवाड, रिंकू वाकळे, बालाजी म्याना, उन्मेश बडवे, नारायण वाधुंबरे, निलेश चौधरी, अदिनाथ कडुसकर, शंतनु सोनवणे, अमोल चव्हाण, अक्षय वराडे, दीपक पाथरकर, स्वप्निल पाथरकर आदि चर्चा करीत आहेत.