मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील मुख्य कलाकार टप्पू म्हणजेच ‘भव्य गांधी’ याच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी करोनामुळे निधन झाले आहे. विनोद गांधी यांनी 11 मे रोजी मुंंबईमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
View this post on Instagram
दरम्यान, आपल्या वडिलांच्या आठवणीत भव्यने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्याने बॉलिवूड अभिनेता ‘सोनू सूद’ आणि उपचारासाठी मदत केलेल्या डॉक्टरांचे देखील आभार मानले आहे.
View this post on Instagram
‘माझ्या वडिलांना 9 एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना डॉंक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. करोनावर मात करण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. माझ्या आयुष्यात जे काही चांगले झाले आहे, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या वडिलांना जाते. या आशयाची पोस्ट भव्यने शेअर केली आहे.
View this post on Instagram
तसेच भव्यने नागरिकांना आणखी एक आवाहन सुद्धा केले आहे. “मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो लवकर लसीकरण करून घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका… जीवघेण्या व्हायरसवर मात करण्यासाठी हाच एक पर्याय आहे.’ असं तो म्हणाला.