पुणे – जिल्ह्यात “टॅंकर वारी’ सुरू झाली आहे. खेड तालुक्यातील वाशेरे गावात पहिला टॅंकर सुरू झाला असून, आतापर्यंत जिल्ह्यात 20 टॅंकरने 16 गाव, 49 वाड्या वस्त्यांवरील 19 हजाराहून अधिक नागरिकांची तहान भागवली जात आहे. अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार यांनी दिली.
गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात सर्व पाणीसाठे शंभर टक्के भरले होते. त्यामुळे यावर्षी एप्रिलच्या अखेरीस टॅंकर सुरू करण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक टॅंकर आंबेगाव तालुक्यात असून, येथील 8 गावं आणि 25 वाड्या-वस्त्यांवरील 11 हजार 568 ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. जुन्नर आणि खेड तालुक्यात प्रत्येकी 3 तर भोरमध्ये 2 आणि हवेली तालुक्यात 1 टॅंकर सुरू झाला आहे. भोरमधील 2, जुन्नरमध्ये 3, खेडमध्ये 2 तर हवेळीमध्ये 1 असे 8 गावांमध्ये हा पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय मागणीनुसार पाणीपुरवठा करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
—-