कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सीमाभागात शिवाजी विद्यापीठामार्फत मराठी भाषिक तरुण-तरुणींसाठी शैक्षणिक संकुल उभं करावं या पद्धतीचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला होता. याला आता मूर्त रूप येणार आहे. सीमाभागात उभारल्या जाणाऱ्या या शैक्षणिक संकुलाचे काम तात्काळ सुरू करा असे आदेश उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेत. ते कोल्हापूरात बोलत होते.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीत दोन भागामध्ये शैक्षणिक संकुल उभं करावं यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. त्यासाठी चंदगड तालुक्यात शिनोळी सह एकूण 3 गावांची निवड करण्यात आली आहे. या 3 गावांपैकी 2 ठिकाणी हे शैक्षणिक संकुल उभ राहणार आहे. असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सीमाभागात उभारल्या जाणाऱ्या संकुलाचे काम तात्काळ सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असून या शैक्षणिक संकुलात पारंपारिक शिक्षणाबरोबरच डेव्हलपमेंट अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात कोविड च मोठं संकट आहे या संकटात सर्व विद्यापीठ लढा देत आहेत. यात शिवाजी विद्यापीठ देखील लढा देत असून 6 हॉस्टेल कोविड सेंटर म्हणून वापरात आहेत. त्यामुळे यूजीसीने या गोष्टींची दखल घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला पाहिजे अस सामंत म्हणाले.
महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत असून डिझास्टर मॅनेजमेंट सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात परीक्षा होणार नाही हे आम्ही युजीसीला कळवणार आहोत. जर आयआयटीने परीक्षा रद्द केली, ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी परीक्षा रद्द केली तसंच महाराष्ट्र सरकारने ही परीक्षा रद्द केलीय. दरम्यान, कोविड पास असा शिक्का लावून विद्यार्थी पास होणार असं विरोधक सांगतात हे विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करणे आहे असे देखील ते म्हणाले.
खासदार विनायक राऊत यांच्या मुलान केलय काय ?
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या मुलान केलय काय असा प्रश्नच उदय सामंत यांनी माध्यमांना विचारला. ट्विट करणाऱ्याबाबत मी कधीच बोलणार नाही आणि ट्विट केलेला हा विडीओ एडिट व्हिडिओ आहे. मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे की विनायक राऊत यांचा मुलगा हा पूर्ण निर्व्यसनी आहे. खासदारांच्या चिरंजीव आणि स्वतःहून काही केलेले नाही त्यामुळे हा सर्व विषय संपलेला आहे असेही ते म्हणाले.
फि वाढ होणार नाही
दरम्यान, राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरून सुद्धा परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे हि फी परत द्यावी का ? किंवा पुढच्या वर्षी याच तिच्या आधारे परीक्षा घेता येतील का? याचा देखील विचार राज्य सरकार करत असून फी वाढ कोणत्याही परिस्थितीत होणार नाही यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.