मुंबई : कोरोना संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातल्या कोरोना स्थितीबाबत मोदी यांनी यावेळी आढावा घेतला.
दरम्यान राज्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ३२ वर पोहचला आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये, शाळांना सरकारने ३१मार्चपर्यंत बंद ठेवले आहे.