भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हे दोघेही भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू आहेत. काही दिवसांपासून या दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र याबाबत कोणालाही अधिकची माहिती नाही काहीही समोर आलेले नाही. दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट आणि रोहितच्या नात्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
#DuteeChand | अॅथलीट दुती चंदने समलिंगी पार्टनरशी खरंच लग्न केलंय? जाणून घेऊया सत्य!
रवी शास्त्री यांनी दोन्ही खेळाडूंमध्ये मतभेद असल्याच्या चर्चेचे खंडन केले. ते म्हणाले की, “विराट आणि रोहितमध्ये असे काहीही नाही. दोन्ही खेळाडूंचे एकमेकांसोबत चांगले संबंध आहेत. बाहेर लोक चर्चा करतात त्या गोष्टींचा विचार करायला दोघांकडेही वेळ नाही.” रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात चांगली केमिस्ट्री टी-२० वर्ल्ड कपदरम्यान पाहायला मिळाली.
#DuteeChand | अॅथलीट दुती चंदने समलिंगी पार्टनरशी खरंच लग्न केलंय? जाणून घेऊया सत्य!
जेव्हा कोहलीने भारताला पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून दिला तेव्हा रोहितने कोहलीला खांद्यावर उचलून घेतले होते. त्यावेळी दोघांची ही मैत्री चाहत्यांना खूप आवडली होती. अशा परिस्थितीत दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे असे म्हणायला काही हरकत नाही. कोहलीही मैदानावर अनेकवेळा विनोद करताना दिसत असतो. खेळाडूंमधील वादांच्या चर्चा चाहत्यांकडून जास्त पसरतात.
भारतीय संघाचं पुढील लक्ष हे बांगलादेश दौऱ्यावर होणारी एकदिवसीय मालिका आहे. भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल विश्रांतीनंतर या मालिकेसाठी परतले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली संघ बांगलादेशमध्ये खेळण्यासाठी तेथे पोहोचला आहे.
#BANvIND pic.twitter.com/4xYAOcaVNj
— BCCI (@BCCI) December 2, 2022
न्यूझीलंड दौऱ्यावर वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत एकदिवसीय संघाचे नेतृत्व शिखर धवनने आणि हार्दिक पंड्याने टी-२० मध्ये संघाची जबाबदारी पार पडली. या दौऱ्यात संघाने टी-२० मालिका जिंकली तर एकदिवसीयमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता भारतीय संघाचा बांगलादेशविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना ४ डिसेंबर रोजी ढाका येथे होणार आहे. यानंतर होणारे दोन सामने हे अनुक्रमे ७ आणि १० डिसेंबरला होणार आहेत. एकदिवसीय मालिकेनंतर दोन कसोटी सामान्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे.