महाड – महाडमधील तळीये गावात दरड कोसळून अनेकांचा दुर्देवी मृत्यू झाला. 40 पेक्षा अधिक माणसांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, 50 हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेची केंद्र सरकारकडूनही दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. गावकऱ्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांनी गावकऱ्यांना धीर देण्याचाही प्रयत्न केला.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray visits Taliye village of Mahad, Raigad to review the flood-like situation following incessant rain in the area pic.twitter.com/wW2T0LzHPp
— ANI (@ANI) July 24, 2021
तुमच्यावर मोठा प्रसंग कोसळलेला आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा, बाकी इतर गोष्टी या सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करु. सरकारकडून सर्वांना मदत दिली जाईल, असे आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी तळीये गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनिल तटकरेही उपस्थित होते.
Compensation will be given to all those who have suffered losses due to floods. We will try that no lives are lost in such incidents in the future: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, at Taliye village of Mahad, Raigad pic.twitter.com/R5XOwv3QiH
— ANI (@ANI) July 24, 2021
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी तळीये ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवणार असल्याची माहिती दिली. तळीयेसारख्या डोंगरउतारावर असलेल्या गावांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन केलं जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाडमधील तळीये गावास भेट देऊन पाहणी केली. सरकारतर्फे गावकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल तसेच त्यांचे पुनर्वसन केले जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. गावकऱ्यांनी काळजी करू नये अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला. pic.twitter.com/3n3FUmzvEw
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 24, 2021