मुंबई – काल सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हे चित्र फक्त मुंबई-पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यासह देश आणि जगात दिसत होतं. करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर जगभरातील लोकांनी अत्यंत जल्लोषात नाचतगात नववर्षाचं स्वागत केलं. तसेच बरोबर 12 चा ठोका पडताच हॅपी न्यू इयर म्हणत लोकांनी एकमेकांना अलिंगनही दिली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून जोश आणि आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
दरम्यान, या सरत्या वर्षी तळीरामांनी देखील आपली पूर्ण तहान भागवली असल्याचं दिसून आलं आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून सरकारी तिजोरीत चांगलीच भर पडली आहे. आर्थिक वर्षातील 9 महिन्यात 14,480 कोटींचा महसूल मिळाला आहे. करोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्यामुळे मद्यविक्रीदेखील जोमाने वाढली असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 34.5 कोटी लिटर देशी मद्याची विक्री नोंदवण्यात आली. तर, 2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात राज्यात 25 कोटी लिटर मद्य विकले गेले होते. तर, सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 23.5 कोटी लिटर विदेशी मद्याची विक्री झाली.
तर, सर्वात जास्त मद्य विक्री ही महाराष्ट्रात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. करोना काळात मद्यविक्रीयला पूर्ण पणे ब्रेक लागला होता. मात्र, त्यानंतर आर्थिक व्यवहार सुरळीत चालू ठेवण्यासाठी सर्वप्रथम दारूची दुकाने खुली करण्यात आली होती. आणि नंतर तळीरामांनी आपला घसा ओला करण्यासाठी सरकारची तिजोरी संपूर्ण भरून टाकली होती.