नवी दिल्ली – यादवी सुरू असणाऱ्या अफगाणिस्तानात तालिबानने पुन्हा सत्ता प्रस्थापित केल्यानंतर भारताने नागरीकांची सुटका करण्यासाठी लष्करी मोहीम सुरू केली आहे. त्या देशातून शनिवारी 85 भारतीयांना मायदेशी आणण्यात आले. काबूलहून पहाटे या विमानाने उड्डाण केले. दरम्यान, कोणत्याही भारतीय नागरिकाचे अपहरण केले नसून सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे.
आज भारतीयांना परत आणणारे विमान इंधण भरण्यासाठी तजाकीस्तानमध्ये थांबले होते. भारताने यापुर्वी राजनैतिक अधिकाऱ्यांना कंदहारमधून हे शहर तालिबानच्या हातात सापडण्याच्या आधी आपले राजनैतिक अधिकारी परत आणले होते.
सुमारे दीडशे भारतीयांना तालिबानाने अपहृत केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, तालिनबानने हा दावा फेटाळून लावला आहे. आमचे योध्दे अद्याप संयम बाळगत आहेत, असे असे तालिबानच्या एका नेत्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितल्याचे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे.
आम्ही कोणत्याही परदेशी नागरिकाचे अपहरण केले नाही. मात्र, देश सोडण्यापुर्वी काही जणांची चौकशी केली होती, अशी पुस्ती त्यांनी जोडली. त्यानंतर अफगाणिस्तानातील माध्यमांनी स्पष्टीकरण दिले की, काबुलमधील सर्व भारतीय सुरक्षित आहेत. त्यांच्या मायदेशी जाण्यासाठी कगदपत्रे पाठवण्यात आली आहेत
अफगाणिस्तानातील सरकारच्या उभारणीबाबत आणि त्याच्या स्वरूपाबाबत येत्या काही आठवड्यात निर्णय घेण्यात येईल. काही नागरिकांवर अत्याचार झाल्याच्या घटना आमच्या कानावर आल्या आहेत. जर त्यात तालिबानच्या सहभाग असेल तर त्याचा शोध घेण्यात येईल, असेही तालिबानच्या नेत्याने स्पष्ट केले.