दुबई – भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याला पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने त्रिफळाबाद केले. मात्र, हा चेंडू नोबॉल असल्याचे रिप्लेमध्ये दिसत होते. पंचांकडून इतक्या महत्त्वाच्या सामन्यात अशी चूक कशी झाली, असा सवाल आता चाहत्यांसह काही माजी क्रिकेटपटू व समालोचकही विचारत आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यावर लगेचच पुढील षटकात शाहिनने रोहितप्रमाणे राहुललाही बाद केले. या चेंडूवर राहुलचा त्रिफळा उडला. मात्र, रिप्ले दाखवला गेला तेव्हा शाहिनचा पाय लाईनच्या पुढे पडल्याचे सोबतच्या छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे.
त्याने नोबॉल टाकल्याचे स्पष्ट दिसत होते. इतकी मोठी चुक पंचांच्या लक्षात का आली नाही. अशा चुकीच्या निर्णयाचा कीती मोठा फटका भारतीय संघाला बसला, अशा प्रतिक्रीया आता उमटत आहेत.