टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघाची निवड
मुंबई : ऑस्ट्रोलियात होणा-या महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. संघात शेफाली वर्माने पुनरागमन केले असून रिचा घोष या पंधरा वर्षाच्या नवोदित खेळाडूला संधी देण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर हिच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
📢Squad Announcement📢@ImHarmanpreet will lead India's charge at @T20WorldCup #T20WorldCup #TeamIndia pic.twitter.com/QkpyypyJKc
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2020
येत्या २१ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. भारतीय संघाचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. भारतीय संघाचा सलामीचा सामना सिडनीत २१ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रोलियाविरूध्द तर दुसरा सामना २४ फेब्रुवारीला बांगलादेशविरूध्द पर्थ येथे होणार आहे. तिसरा सामना न्यूझीलंडविरूध्द मेलबर्न येथे २७ फेब्रुवारी रोजी तर चौथा सामना श्रीलंकेविरूध्द २९ फेब्रुवारी रोजी होईल. विश्वचषकातील अंतिम सामना ८ मार्च रोजी होईल.
टी-२० वर्ल्ड कप संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर आणि अरूधंति रेड्डी.